शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

राज्यातील दुष्काळजन्य स्थिती ३१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 19:17 IST

महाराष्टतील दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली असून, त्याद्वारे केंद्राने ठरवून दिलेल्या तीन टप्प्यातील निकषांची पाहणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअ‍ॅप’द्वारे तीन टप्प्यात दुष्काळसदृश तालुक्यांचे सर्वेक्षणदुष्काळग्रस्त भागांना तातडीने मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर : महाराष्टतील दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली असून, त्याद्वारे केंद्राने ठरवून दिलेल्या तीन टप्प्यातील निकषांची पाहणी करण्यात येत आहे. त्यानुसार सलग २१ दिवस पाऊस न पडलेल्या २०० तालुक्यांचे सर्वेक्षण सुरू आहे, हे तिन्ही टप्प्यांतील सर्वेक्षण २५ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होऊन ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्टÑात काही ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी असमाधानकारक पाऊस झाला आहे; त्यामुळे काही ठिकाणी शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे; पण हे नुकसानग्रस्त भागांची तपासणी करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या वतीने ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली असून, त्याचे मुंबईत शुक्रवारीच उद्घाटन झाले.

या ‘अ‍ॅप’द्वारे महाराष्टÑात पडलेल्या पावसाचे गाव, मंडल, तालुका व जिल्हानिहाय मोजमाप करण्यात येत आहे. सलग २१ दिवस ज्या तालुक्यात पाऊस पडत नाही, असे तालुके संभाव्य दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करण्यात येत आहेत, अशा राज्यातील २०० तालुक्यांत २१ दिवस पाऊस पडला नसल्याने केंद्राच्या निकषांप्रमाणे त्यांचा संभाव्य दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.

या दुसऱ्या टप्प्यातील पाहणी सुरू करण्यात येत आहे. त्या पाहणीत त्या-त्या भागातील पर्जन्यमान, भूजल पातळी, जमिनीची आर्द्रता, पिकांची स्थिती यांचे उपग्रहामार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. याशिवाय निवडलेल्या तालुक्यांची तिसºया टप्प्यात प्रत्यक्ष पाहणी करून दि. २५ आॅक्टोबरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून दुष्काळजन्य परिस्थिती ३१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुष्काळग्रस्त भागांना तातडीने मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर